हिंजवडीमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत २५ वर्षीय IT इंजिनिअरने तरूणीने आपले जीवन संपवले आहे. सॉरी! माझी जगायची इच्छा संपली असे म्हणत तरूणीने आयुष्य संपवले. २५ वर्षीय तरूणीने पहाटे २१ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.
मिळविलेल्या माहितीनुसार , ३१ मे रोजी ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव अभिलाषा असं आहे. नैराश्यातून अभिलाषाने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नेमकं काय प्रकरण ?
सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे.... अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीतील २५ वर्षीय आयटी अभियंता तरुणी अभिलाषा हिने आत्महत्या केली. ३१ मे रोजी पहाटे साडेचार वाजता अभिलाषा हिने २१ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे या २५ वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4 :30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली. त्यानंतर तिने लिफ्टने २१ व्या मजल्यावर आपल्या घरी जात पहाटे ४. ४२ सुमारास आत्महत्या केली . अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात शरीरावरील महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याच नमूद करण्यात आलं आहे.