राज्यातील घडामोडींना वेग आला असून महायुती सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा एक महत्वाचा आणि मोठा आणि निर्णय राज्यसरकारने आला आहे.राज्य सरकारने नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे.
राज्य सरकारने आता निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जे कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहे त्यांना पुन्हा एकदा सरकारी सेवा करण्याची संधी मिळणार आहे. यापुढे रिक्त जागा या करार पद्धतीने भरण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे 65 वर्षांपर्यंत काम करता येणार आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने भरती करण्याची निर्णय अधिकृत जाहीर केला आहे. रिक्त पदांचा ताण कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पुढे निवृत्त शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. यासाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्यात येणार आहे.