स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने लोकसभेला फटका बसला : नेमकं काय म्हणाले अजित पवार?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने लोकसभेला फटका बसला : नेमकं काय म्हणाले अजित पवार?
img
Dipali Ghadwaje
पिंपरी  : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या, त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसला. कारण गल्ली बोळातील, गाव-खेड्यातील लोकं थेट खासदारांकडे कसे काय येणार? ते स्थानिक लोकप्रतिनिधीकडे जातात.

मात्र, निवडणुका लागतील, लागतील या आशेपोटी ते वारेमाप खर्च करुन करुन थकले. मग याचा लोकसभेवेळी त्यांना फटका बसला. आता निष्ठावान म्हणतात आमचं काय? पण आमची निष्ठा तुमच्यावर आहे अन् तुमची निष्ठा आमच्यावर आहे.

आगामी पालिका निवडणुकांमध्ये 4 चे प्रभाग होण्याची शक्यता दाट आहे, त्या अनुषंगाने कामाला लागा. मुंबईचा मात्र एकच प्रभाग असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरी येथे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेतील अजित गव्हाणे यांच्यासह भोसरी विधानसभेतील विविध पक्षातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्याला विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, भोसरी विधानसभेचे आमदार विलासशेठ लांडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार रुजलेले आहेत,आपण तेच विचार घेऊन पुढं जातोय. मधल्या काळात आपलेच पदाधिकारी घेऊन त्यांना पदं देऊन इथं बदल घडवला. भाजपचे दिवंगत लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना उद्देशून अजित पवारांनी भाजपला टोला लगावला.

तसेच, काही दिवसांपूर्वी अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेले. मात्र, ते शरीराने तिकडं होते, मनाने मात्र आपल्यासोबत होते हे मला ही जाणवत होतं. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अजित गव्हाणे माझ्या संपर्कात होते. आता आम्हाला मान-सन्मान द्या, अशी चर्चा माझ्याशी होत होती, अशी आतली बातमी अजित पवारांनी यावेळी सांगितली.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group