महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून सुरू आहे. अशोक खरातच्या चौकशीतून अनेक खळबळजनक खुलासे समोर येत असून दुसरीकडे पोलिसांकडून त्याच्याशी संबंधित ठिकाणांची झाडाझडती सुरू आहे. त्याच्या कार्यलायाला देखील सील करत टाळं ठोकण्यात आलं आहे.
...पण वासना सुटेना !
महाराष्ट्राला हादरवणारा अशोक खरात अपघात आणि अर्धांग वायूच्या झटक्यानं बेजार झाला होता. साधारण दीड वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, इतका मोठा शारीरिक आघात होऊनही खरातचा महिलांच्या शोषणाचा 'सिलसिला' सुरूच होता. उत्तेजक (शक्तिवर्धक) औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर अशोक खरातने शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. विशेष म्हणजे डॉक्टर भक्तानेच खरातवर वेळीच उपचार करून जीव वाचवला. आ
पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. भविष्य सांगण्याचा बहाण्याने अशोक खरात याने 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे.