अवकाळीचा कहर! वीज पडून 15 बकऱ्यांचा मृत्यू ; कुठे घडली घटना?
दैनिक भ्रमर
नाशिक प्रतिनिधी :विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. हा पाऊस अनेक ठिकाणी सुखावह वाटत असला तरी जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने ‘कहर’ बरसावला आहे.
बागलाण तालुक्यातील टेंभे वरचे गावात भाऊसाहेब महादू माळी यांच्या घरावर रात्री 1.00 वाजता वीज पडून 15 बक-या व सर्व संसार जळून खाक झाला आहे. याशिवाय काही ठिकाणी तुरळक घरांची पडझड व नुकसानीच्या घटना देखील घडल्या आहेत.