शालेय मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ;  आत्ताच जाणून घ्या
शालेय मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ; आत्ताच जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
राज्य सरकारकडून  मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मोठा निर्णय  घेतला आहे. इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांच्या रक्कमेत ही वाढ करण्यात आली आहे.

या निर्णयानुसार राज्यातील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेत तब्बल तिप्पटीने वाढ करण्यात आली आहे.  सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून दिली जाणारी शिष्यवृत्ती ही राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य विभागामार्फत  देण्यात येते.

इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकण घेणाऱ्या फक्त मुलींना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात 60 रुपये वरुन 250 प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे. तर विभाभज , विमाप्र व इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक स्वरुपात दिली जाणारी 100 रुपयांची रक्कम ही 300 रुपये प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे.

आणखी वाचा >>>> महाराष्ट्रात NIA- ATSची मोठी कारवाई ; छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालन्यातून तिघांना घेतलं ताब्यात

 असा करा अर्ज?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. किंवा आपल्या जिल्ह्याच्या संबंधित प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधावा. या शिष्यवृत्तीमुळं शिक्षण प्रभावामध्ये मुलींचे गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group