मोठी बातमी ! भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात आता  असणार संपर्कमंत्री ?
मोठी बातमी ! भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात आता असणार संपर्कमंत्री ?
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून आता पालकमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याचदरम्यान आता भाजपमधून मोठी बातमी समोर येत आहे. पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तीव्र संघर्ष सुरू असताना भाजपने एक  नवीन पद निर्माण केलेले आहे.

ज्या जिल्ह्यामध्ये भाजपचा पालक मंत्री नाही तिथे संपर्कमंत्री नेमण्यात येणार असल्याची माहिती आहे. सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भारतीय जनता पक्षाकडून विशेष नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री काम करणार आहेत.  संपर्कमंत्री नेमून अप्रत्यक्षपणे मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांवर धाक राहावा, यासाठी भाजपने मोठी चाल खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात  आहे. 

महायुतीने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केल्या नंतर तिन्ही पक्षातले काही नेते नाराज झाले आहेत. दरम्यान, भाजपमधील नाराजी शमविण्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी भाजपने संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण केल्याचे सांगितले जाते.

पालकमंत्रिपदाच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण करून कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यावर पक्षाचा भर असेल. पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचे कोणतेही काम अडू नये तसेच सरकारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचाही सहभाग असावा, यासाठी संपर्कमंत्री प्रयत्न करतील, असे सांगण्यात येते.

ठाणे- गणेश नाईक, पालकमंत्री एकनाथ शिंदे
बीड- पंकजा मुंडे, पालकमंत्री-अजित पवार
संभाजीनगर- अतुल सावे, पालकमंत्री- संजय शिरसाट
पुणे- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री- अजित पवार
कोल्हापूर- माधुरी मिसाळ, पालकमंत्री- प्रकाश आबिटकर
रत्नागिरी-उदय सामंत, पालकमंत्री- आशिष शेलार
इतर बातम्या
Join Whatsapp Group