'२४ डिसेंबर पर्यंत आरक्षण द्या, अन्यथा.....'  मनोज जरांगेंचा इशारा
'२४ डिसेंबर पर्यंत आरक्षण द्या, अन्यथा.....' मनोज जरांगेंचा इशारा
img
Dipali Ghadwaje
मराठा आरक्षणासाठी सरकारला डेडलाईन दिल्यानंतर मनोज जरांगेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सरकार राज्यभर काम करत आहे, सरकारचं काम जोरात सुरू असल्याचं सांगितलं आहे. 'जे आमचं आहे, तेच सरकार आम्हाला देत आहे, आम्ही कोणाचाही घास हिरावून घेत नाही', अस यावेळी जरांगे पाटील बोलतांना म्हणाले.  तसेच 'आमच्याकडे पुरावे आहेत, त्यामुळे आरक्षण द्यावे लागेल. पुरावे आहेत तर दाखले मिळावेत हीच गावातील ओबीसींची भावना' असल्याचंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 

यावेळी पुढे बोलताना 'मराठ्यांना पुरावे मिळू नयेत ही फक्त नेत्यांची भावना' असं म्हणत  जरांगें यांनी सरकारला टोला लगावला. दरम्यान 'आमच्या नोकऱ्या आम्हाला मिळाव्यात, ज्यांनी आमच्या नोकऱ्या हडपल्या त्यांना काढून टाकायला हवं, असंही ते पुढे म्हणालेत, आम्हाला आमच्या हक्काचं मिळायला हवं, २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू', असं मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे.

तर 'ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देतांना आम्हाला मिळाल्या पाहिजे असं जरांगे म्हणाले आहे. ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे', असं जरांगे यांनी म्हटले आहे. पुरावे असतानाही 40 वर्षे मराठा समाजाचं वाटोळं झालं. पण आता ज्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातंय. आम्हाला आरक्षण मिळतंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत.

नेत्यांमुळेच मराठा समाजाचं नुकसान झाल्याचंही जरांगे यावेळी म्हणालेत. आरक्षण मिळेपर्यंत मी फटाके वाजवणार नाही, आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केली, त्यांच्या घरात अंधार आणि मी आनंद कसा व्यक्त करू, मी दिवाळी साजरी करणार नाही असंही पुढे जरांगे म्हणालेत.

फडणवीसांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले की, फडणवीस आरक्षण घेऊन आले तर त्यांच्या गळ्यातच पडतो. फडणवीस शहरात येणार आहे. त्यांना मी कस सांगू भेटायला या म्हणून, त्यांनी आरक्षण घेऊनच यावे, असंही त्यांनी म्हटलं आहे.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group