ऑपरेशन सिंदूर नंतर महाराष्ट्र  हायअलर्टवर !  राज्यातील ''या'' ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
ऑपरेशन सिंदूर नंतर महाराष्ट्र हायअलर्टवर ! राज्यातील ''या'' ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
img
दैनिक भ्रमर
पहलगाम हल्ल्याचा बदल म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना नष्ट केले आहे. या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर देशात आता सर्वच राज्यात आता अधिक खबरदारी घेत असून ऑपरेशन सिंदूर नंतर  महाराष्ट्र हायअलर्टवर आहे . 

 महाराष्ट्रासह देशभरातील सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सर्व पोलीस युनिट कमांडर आणि जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रात सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याचे निर्देश दिले. 

कोणत्याही अनुचित घटना टाळण्यासाठी, विशेषतः जास्त गर्दी असलेल्या आणि संवेदनशील भागात, गस्त वाढविण्याचे आणि सुरक्षा वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. खबरदारी म्हणून, राज्यातील पर्यटन आणि आध्यात्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या सर्व ठिकाणी अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group