धक्कादायक ! पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय, आधी तिला जीवे मारलं नंतर उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक ! पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय, आधी तिला जीवे मारलं नंतर उचललं टोकाचं पाऊल
img
नंदिनी मोरे
आजकाल गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान, एका पती पत्नीचा वाद विकोपाला जावून एक भयानक घटना घडली असल्याचं उघडकीस आले आहे. एका पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करून पतीन स्वतः आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. 

चारित्र्यावर संशय घ्यायचा याच वादातून हे हत्याकांड घडलं आहे.चाळीसगाव तालुक्यातील हातगाव गावात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विजय सुखदेव चव्हाणके (पती) याने आपल्याच शेतात पत्नी वर्षा विजय चव्हाणके हिचा गळा आवळून खून केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

विजय हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, यातूनच ही धक्कादायक घटना घडली आहे. विजयने आधी आपल्या पत्नीचा गळा आवळला या घटनेत वर्षाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने देखील गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. विजय आणि वर्षा यांच्यामध्ये रात्री कडाक्याचं भांडण झालं.

पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.  पत्नीचा खून करून स्वत:ही आत्महत्या केली आहे.  तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी मिळून आलेली नाही.

पती पत्नीच्या दुहेरी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास पथक करत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.  या बाबत मृतांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस तपास करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group