विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसोबत काँग्रेसची छाननी समिती महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार छाननी समिती 27, 28 व 29 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे.

राहुल गांधी यांनी आज छाननी समिती सोबत चर्चा केली. प्रामाणिक उमेदवारांना तिकीट देण्याच्या राहुल गांधी यांच्या समितीस सूचना केल्या असल्याची माहिती मिळत असून तिकीट वाटप करताना सामाजिक भान ठेवण्याचेही राहुल गांधी यांनी आदेश दिल्याचे समजते.