केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता "इतक्या" रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर
img
दैनिक भ्रमर
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राने आता एलपीजीवरील अनुदानात वाढ केली आहे. त्यामुळे आता एललपीजी गॅस सिलेंडर कमी दरात मिळणार आहे.

३७ दिवसांत मोदी सरकारने दुसऱ्यांदा दर कमी केले आहेत. ज्याचा फायदा १० कोटी लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. उज्जवला योजनेतील लाभार्थींना आता 200 ऐवजी 300 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. याआधी रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने केंद्र सरकारने 200 रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. 


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर 200 रुपयांनी कमी केले होते. ही किंमत 1100 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत कमी झाली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 700 रुपयांना गॅस मिळू लागला.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या भगिनींना आता 300 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group