भीषण अपघात ! मेहंदी क्लास संपवून घरी परतणाऱ्या तरुणीचा  कारखाली चिरडून मृत्यू
भीषण अपघात ! मेहंदी क्लास संपवून घरी परतणाऱ्या तरुणीचा कारखाली चिरडून मृत्यू
img
Dipali Ghadwaje
राज्यात रस्त्याने अपघाताच्या घटना घटताना दिसत आहे. अनेकांना यात आपला जीव देखील गमवावा लागत आहे. मुंबईच्या मालाड भागात अपघाताची घटना समोर आली आहे. एका कारने महिलेस कारखाली चिरडलं आणि डिव्हायडरपर्यंत खेचत नेलं आहे. अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. आमदार अस्लम शेख यांच्या घराबाहेरील रस्त्यावरील ही घटना आहे. एका वृत्त संस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेहंदी क्लास संपवून महिला घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघातात सत्तावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशिराची ही घटना आहे. अपघातानंतर नागरिकांनी कारचालकाला पकडून मारहाण केली असल्याचं समजत आहे. कार चालकाला नागरिकांनी पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं? 

मेहंदी क्लास संपवून पायी घरी जाणाऱ्या 27 वर्षीय महिलेला कार चालकाने धडक दिली. प्रत्यक्षदर्शी आणि कारचालकाने महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला. कारचालकमर्चंट नेव्ही मध्ये सेवेला असल्याचं कळतंय. नागरिकांकडून कारचालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.जमावाकडून मारहाण झाल्याने चालक देखील गंभीर जखमी झाला आहे.

चालकाने मद्यपान केले होते किंवा नाही हे स्पष्ट नाही. पोलिसांनी चालकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. मद्यपान केले होते किंवा नाही हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group