''गोड बोलून धनगर आरक्षण...'',  मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप
''गोड बोलून धनगर आरक्षण...'', मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप
img
दैनिक भ्रमर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणा सोबतच मराठा आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी  देवेंद्र फडणवीस यांच्यावर याआधीही जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान आता मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर  खळबळजनक  आरोप केले आहे. फडणवीस यांनी गोड बोलून धनगर आरक्षण मोडून काढलं, असा खळबळजनक आरोपच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. . त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
  
बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी हा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यानी माझी एसआयटी चौकशी लावलीय. तिकडे 70 हजारवाले चोर आहेत. त्यांची एसआयटी लावायची सोडून माझी एसआयटी लावली आहे. फडणवीस यांनी जो ट्रॅप लावला आहे, त्यात मी मेलो तरी बदलणार नाही, असं सांगतानाच आपल्याला आरक्षण नाही मिळालं तर सरकारचा सुपडा साफ करायचा आहे, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

तसेच ते पुढे  म्हणाले की, फडणवीस यांनी नवीन नवीन आमदार उभे केले. फडणवीस यांच्या माध्यमातून यांना त्यांच्या संपत्ती सांभाळायची आहे. पण फडणवीस साहेब मराठे तुम्हाला लोळवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आरक्षण दिलं नाही तर तुमचे 113 उमेदवार घरी गेलेच म्हणून समजा. गोरगरीब मराठ्यांनी आता जागं व्हावं. मार खायची वेळ आली तर का. केस झाली तर होऊ द्या. पण मागे हटू नका, असं आवाहनच त्यांनी केलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group