खळबळजनक : मुलांसाठी नवऱ्यानं घेतला पत्नीचा जीव ; नेमकं काय प्रकरण?
खळबळजनक : मुलांसाठी नवऱ्यानं घेतला पत्नीचा जीव ; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  मिरा भाईंदरमध्ये भररस्त्यात दिवसाढवळ्या महिलेची हत्या झाल्याची घटना मिरारोडच्या नयानगर मध्ये घडलीय. दोन मुलाच्या ताब्यासाठी नवऱ्यानं पत्नीवर चाकू हल्ला करत तिचा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. 

ही घटना मिरारोडच्या नयानगरमधील एन.एच.शाळेसमोरील रस्त्यावर घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास नया नगर पोलिस करत आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,मृत महिलेचे नाव अमरीन खान वय वर्षे ३६ आहे तर आरोपी पतीचे नाव नदीम खान ३७ वर्ष आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरू होते. पती नदीम खान आणि अमरीन खान यांना दोन मुलं आहेत. नदीम यांना दोन्ही २ मुलांचा ताबा हवा होता. 

त्यावरुन नवरा बायकोमध्ये वाद सुरू होता. मुलांचा ताबा देण्यास अमरीन यांचा नकार होता. त्याचा राग नदीमच्या मनात होता, त्याच रागातून त्याने पत्नी अणरीन यांच्यावर भर दिवसा चाकू हल्ला करत तिची अस्मिता अनिल इमारती समोरील रस्त्यावर हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group