रस्ते अपघाताच्या घटना सातत्याने वाढत चालल्या आहेत , अशातच पुणे -अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रकने महिलेसह दोन लहान मुलांना चिरडले. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिची दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरती सावंत असं मृत महिलेचे नाव आहे. तर स्वराज आणि स्वराली अशी गंभीर जखमी बहीण-भावाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पुणे- अहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव येथे ही अपघाताची घटना घडली. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून महिला आपल्या दोन मुलांना घेऊन दुचाकीवरून शिरुरकडे जात होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या टेम्पोने महिलेसह तिच्या मुलांना चिरडले. अपघातानंतर चालक टेम्पो घेऊन फरार झाला.
या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिची दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने तात्काळ जखमी मुलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताचा तपास शिरूर पोलिस करत आहेत.