मुख्यमंत्र्यांनी कुणाचं ऐकून दगाफटका करू नये, अन्यथा..... - मनोज जरांगें
मुख्यमंत्र्यांनी कुणाचं ऐकून दगाफटका करू नये, अन्यथा..... - मनोज जरांगें
img
Dipali Ghadwaje
मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जालन्यात  मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की एक वर्षापासून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. तो सगळा समाज हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज होणार आहे. शिंदेंना मराठा समाज मानतो. पण आता एकनाथ शिंदे पूर्णपणे मराठा समाजाच्या मनातून उतरणार आहेत. दोन- तीन लोक लोक मुख्यमंत्रीसाहेबांचे कान फुकत आहेत. त्यानंतर मराठा समाजाचा गेम, दगाफटका मुख्यमंत्री शिंदेंनी करू नये. शंभुराज देसाईंना सांगतो की मुख्यमंत्र्यांना समजून सांगा… याचं त्याचं ऐकून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा गेम केला तर ते मराठा समाजाच्या मनातून उतरतील, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी राज्य सरकारकडून सुरु आहे. आम्हाला ही माहिती 15 दिवसांपासूनच आहे. या हालचाली 3 महिन्यांपूर्वीच्या आहेत, या हालचाली नवीन नाहीत, हैद्राबाद गॅझेट लागू करणार हे श्रेय गोर गरीब मराठ्यांचे आहे, हे यश गरिबांचे आहेत. मात्र आम्ही एवढ्यावर थांबणार नाही, आम्हाला सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी पाहिजे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जालन्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

 "हैद्राबाद गॅझेट आणण्याच्या हालचाल आजच्या नाहीत, शंभूराज देसाई 3 महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही एवढ्यावर थांबणार नाही, आम्हाला सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी पाहिजे. कोणीही छाती बडवून घेऊ नका, हे मराठ्यांचे श्रेय आहे. मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांचे किंवा कोणाचंही एकूण गोरगरीब मराठ्यांशी दगा फटका करू नये," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. "राज्यात वेगवेगळी आंदोलन सुरू होत आहेत. आम्हाला त्याचं काही वाट नाही. अधिकार प्रत्येकाला आहे, ज्याने त्याने आंदोलन करावं, पण माझ्या मराठ्यांना खरचटलं नाही गेलं पाहिजे. आमच्या मराठ्यांना गाल बोट लगता कामा नये. हैद्राबाद गॅझेटचा सर्वानाच मोठा फायदा होणार आहे. हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थानच गॅझेट लागू होणे म्हणजे शासकीय नोंदी आहेत मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मी रात्री 12 वाजता आमरण उपोषण सुरू करणार आहे. अन्याय विरोधात उठाव करण्यासाठी मी उपोषण करणार आहे," असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले

"माझा गरीब मराठा 1 वर्ष झुंजत आहे. जर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांशी दगा फटका केला तर शिंदे साहेबांवर मराठा समाज राज्यातील नाराज होणार आहे.संभाजीनगरचे खासदार यांना मराठ्यांशी दगा फटका करू शकतात. फडणवीस साहेबांना या राज्यात रक्तपात करायचा आहे, या राज्यात त्यांना मणिपूरसारखी परिस्थिती करायची आहे," असेही जरांगे पाटील म्हणाले. तसेच स्वातंत्र्य सैनिक लढलेला आहे, त्यांच्या समोर या धर्तीवर जो अत्याचार सुरू आहे तो रोखायचा हे ध्येय होतं, तुम्ही या धरणी मातेच्या पुत्राला सेनेतून कमी करणार आहेत. फडणवीस साहेबांनी किती जरी प्रयत्न केले तर आरक्षण दिल्याशिवाय काही होणार नाही, राज्यात कुठे काही झालं, तर याला देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे जबाबदार राहणार आहेत, असा घणाघातही मनोज जरांगे पाटील यांनी केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group