राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ...! आज 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाचा अंदाज
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ...! आज 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाचा अंदाज
img
Dipali Ghadwaje
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुढील दोन दिवस काही जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम सुरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसानंतर उन्हाची तीव्रता अधिक प्रमाणात जावणत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषकरुन मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. रात्री पाऊस आणि दिवसा घामाच्या धारामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाचा तर ठाणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

राज्यात आज अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर यादरम्यान राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण अशेल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरुपात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group