तीन दिवसांच्या सुट्टीचा बेत करून देवदर्शनासाठी जात असताना व्हेर्ना कार समोरून येणाऱ्या ट्रेलरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुरडीसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा अंत झाला. अभियंत्याच्या कुटुंबातील पाच जणांची एकचवेळी अंत्ययात्रा निघाल्याने अवघ्या लखनौ शहरात सन्नाट झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , बँक मॅनेजर असलेल्या जावेचा निष्प्राण देह पाहून छोट्या जावेनं मृतदेहाला मिठी मारत ओरडून म्हणाली, वहिनी उठा, श्री तुमच्या मांडीवर आहे. आता, तर तुझ्या सुट्ट्यांचे नियोजन करत होता, कुठे निघून गेला? यानंतर, ती रडत रडत बेशुद्ध पडली आणि खाली कोसळली. या संपूर्ण प्रकारानंतर प्रत्येकाचा कंठ दाटून आला.
रविवारी संपूर्ण कुटुंब खाटूश्याम दर्शनसाठी गेले होते. राजस्थानमधील जयपूरमध्ये त्यांची कार एका ट्रेलरला धडकली.
या अपघातात इंजिनिअर अभिषेक, बँक मॅनेजर पत्नी प्रियांशी, सहा महिन्यांची मुलगी श्री, वडील सत्यप्रकाश आणि आई रमादेवी यांचा मृत्यू झाला.
कुटुंब लखनौमधील आहे. अभिषेकचा मोठा भाऊ हिमांशू, काका चंद्रप्रकाश आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी थरथरत्या हातांनी पार्थिवांना खांदा दिला. पांढऱ्या चादरीत गुंडाळलेल्या सहा वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचा मृतदेह पाहून लोक हादरुन गेले.
मृतदेह ठेवण्यासाठी दोन वाहने मागवण्यात आली. पती-पत्नीचे मृतदेह एका गाडीत आणि पालकांचे मृतदेह दुसऱ्या गाडीत ठेवण्यात आले. निष्पाप श्रीचा मृतदेह घराजवळ दफन करण्यात आला. कुटुंबात फक्त आता अभिषेकचा मोठा भाऊ हिमांशू, त्याची पत्नी ज्योती आणि मुलगा जियांशु उरले आहेत. बाकी सर्व काही आठवणी झाल्या आहेत.
आई आणि वडील, मुलगा आणि सून आणि निष्पाप नात
सोमवारी सकाळी घरातून पाचही मृतदेह एक-एक करून बाहेर काढताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. पाच मृतदेह एकत्र पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले. अभिषेकचा मोठा भाऊ हिमांशू, काका चंद्रप्रकाश आणि कुटुंबातील इतर सदस्य थरथरत्या हातांनी मृतदेह उचलत होते. पांढऱ्या चादरीत गुंडाळलेल्या सहा महिन्यांच्या मुलीचा मृतदेह पाहून लोक थरथर कापत होते.
घरातील महिलांचा एकच आक्रोश होता. अभिषेकची वहिनी ज्योती, प्रियांशीचा फोटो छातीशी धरून म्हणत राहिली, "वहिनी, तू फक्त तुझ्या सुट्ट्यांचे नियोजन करत होता, कुठे गेलीस?" महिलांनी एकमेकांना मिठी मारली आणि रडल्या.
सत्य प्रकाश त्यांच्या कुटुंबाचा आधार होते. त्यांची पत्नी, मुलगा अभिषेक सिंह आणि सून आता त्यांच्यासोबत नाहीत. रस्ते अपघातात एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाला.
जयपूरजवळील दौसा जिल्ह्यातील मनोहरपूर वळणावर हा अपघात झाला. कुटुंबाची व्हेर्ना कार वळणावर पोहोचताच समोरून येणाऱ्या कंटेनरशी समोरासमोर धडकली. ही टक्कर इतकी भीषण होती की कारचे तुकडे झाले. पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी सकाळी साडे आठ वाजता कुटुंबाला अपघाताची माहिती मिळाली. काका चंद्रप्रकाश यांनी दिलेल्य माहितीनुसार"आम्ही नाश्ता करत होतो, तेव्हा आमच्या जावयाचा फोन आला की जयपूरमध्ये एक अपघात झाला आहे, सर्वांनी निघून जावे." हे ऐकताच संपूर्ण घरात आक्रोश सुरु झाला. मोठा भाऊ हिमांशू लगेच कुटुंबातील इतर सदस्यांसह जयपूरला रवाना झाला.
तीन दिवसांच्या सुट्टीत दर्शन, मुंडन आणि वाढदिवस
अभिषेकने फक्त तीन दिवसांची सुट्टी घेतली होती. शनिवारी मैनपुरीमध्ये पुतण्याचा वाढदिवस साजरा केला. रविवारी खातू श्याम दर्शनाचाबेत होता. मुलगा जियांशुचा मुंडन समारंभ सोमवारी होणार होता, पण नशिबाने असे वळण घेतले की तिन्ही प्रसंगांऐवजी फक्त अंत्यसंस्कारच राहिले.