गेल्या अनेक दिवसापांसून पासून पती पत्नीच्या वादाच्या अनेक गंभीर घटना उघडकीस आल्या आहेत. नवरा बायकोच्या भांडणातून अनेक गंभीर गुन्हे घडले असून अशाच घटना दिवसागणिक वाढते असल्याने हे चिंतेचे कारण बनले आहे. आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
प्रकाशन कंपनीचे व्यवस्थापक गौरव शर्मा यांनी त्यांची पत्नी रितांशी यांच्यावर विवाहबाह्य संबंध, ड्रग्जचे सेवन, ब्लॅकमेलिंग आणि हत्येचा कट रचणे असे गंभीर आरोप केले आहेत. गौरव यांचा दावा आहे की त्याच्याकडे त्यांच्या पत्नीच्या दुष्कृत्यांचे ठोस पुरावे आहेत आणि त्याच्या जीवाला धोका आहे. त्यांनी तब्बल 1200 पानांचे पुरावे सादर करताना पत्नीचे एकाचवेळी सात तरुणांशी संबंध असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या भावनापूर पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी गौरव शर्मा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे लग्न 2012 मध्ये जागृती विहार येथील रितांशी शर्माशी झाले होते. रितांशी पहिले वर्ष कुटुंबासोबत राहिली. पण गैरवर्तनामुळे, हिंसाचारामुळे आणि कोणालाही न कळवता घराबाहेर पडल्यामुळे गौरव यांना वेगळे घर घ्यावे लागले.
गौरव यांचा आरोप आहे की वेगळे राहिल्यानंतरही रितांशीच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. ती अनेकदा अनेक दिवस घरातून गायब असायची आणि गौरवच्या अनुपस्थितीत पुरुष मित्रांसोबत ड्रग्जचे सेवन करायची. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून, गौरवने गावातील त्याचा 12 वर्षांचा पुतण्या वंश शर्मा याला बोलावले, जो त्याच्या घरी राहू लागला. पुतण्याने केलेल्या खुलाशाने गौरवला धक्का बसला. पुतण्याने सांगितले की जेव्हा गौरव बाहेर असायचे तेव्हा घाणेरडे लोक रितांशीकडे यायचे आणि स्वतःला खोलीत बंद करून घ्यायचे, दारू पिऊन अश्लील बोलायचे.
गौरवने त्याच्या पत्नीचा फोन तपासला तेव्हा त्याला धक्काच बसला. रितांशीच्या सोशल मीडिया अकाउंटवर चार पुरुषांशी (आशिष उर्फ सनी, राज वर्मा, कुलदीप चौधरी आणि अमन सिंग) अवैध संबंधांचे पुरावे सापडले. गौरव यांनी सांगितले की त्याच्याकडे 1200 पानांचे स्क्रीनशॉट आणि अनेक व्हिडिओ आहेत, जे या आरोपांना पुष्टी देतात.
सर्वात गंभीर आरोप म्हणजे रितांशीकडे दोन बेकायदेशीर पिस्तूल आहेत, ज्या तिच्या एका पुरुष मित्राच्या आहेत. गौरवने दावा केला की रितांशी आणि तिचे साथीदार त्याला मारण्याचा आणि 40 लाख रुपयांच्या प्रवास विम्याचे पैसे हडप करण्याचा कट रचत होते. गौरवने असेही सांगितले की, 2013 मध्ये रितांशीने त्याच्यावर खोटा खटला दाखल करून त्याला ब्लॅकमेल केले होते. दबावाखाली, गौरवला तडजोड करावी लागली ज्यामध्ये रितांशीच्या वडिलांना आणि भावाला 2 लाख रुपयांचा चेक, 3 लाख रुपये रोख आणि आठ तोळे सोने दिले.
गौरवच्या म्हणण्यानुसार, 3 डिसेंबर 2024 रोजी रितांशीने त्याला मारहाण केली आणि त्याच्या आई आणि बहिणीला शिवीगाळ केली. गौरवने एसएसपींकडून तात्काळ कारवाई करण्याची आणि त्यांच्या जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. त्याने स्पष्टपणे सांगितले की जर त्याची हत्या झाली तर रितांशी आणि तिच्या मैत्रिणी जबाबदार असतील. या प्रकरणात, सीओ सदर देहात शिव प्रताप सिंह म्हणाले की, 'गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीने एसएसपी कार्यालयात अर्ज सादर केला आहे. हा अर्ज चौकशीसाठी भवनपूर पोलिस ठाण्यात पाठवण्यात आला आहे. चौकशीनंतर जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल.