केदारनाथला पोहचण्यापूर्वीच काळाचा घाला..! कार पुलावरून कोसळली ; ४ जिवलगांचा मृत्यू
केदारनाथला पोहचण्यापूर्वीच काळाचा घाला..! कार पुलावरून कोसळली ; ४ जिवलगांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये भीषण अपघातामध्ये ४ जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . १०० च्या स्पीडमध्ये असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावरून खाली कोसळली. २० फूट उंचावरून ही कार थेट पाणी भरलेल्या शेतात पडली. या अपघातामध्ये कारमध्ये असलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघाताचा तपास उत्तर प्रदेश पोलिस करत आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात छपार परिसरातील रामपूरमध्ये झाला. कारमधील सर्वजण गुजरातमधील होते. हे सर्वजण उत्तराखंडमधील केदारनाथला जात होते. कार १०० च्या स्पीडमध्ये होते. त्यावेळी अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार संरक्षण भिंत तोडून पूलावरून खाली कोसळली.

अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील सर्वांना बाहेर बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी चौघांना मृत घोषीत केले तर एकाची प्रकृती गंभीर आहे.

अपघातामध्ये, मोहन ठाकूर, करण, अमित, विपुल यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण गुजरातच्या गांधीनगरमधील तारापूरमध्ये राहणारे होते. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पानीपत-खटीमा नॅशनल हायवेवर कारला अपघात झाला. कारमधील सर्वजण हरियाणाच्या दिशेवरून येत होते. पूलावर वळणाचा रस्ता आहे. कारचा स्पीड जास्त होता.

त्यामुळे कारचालकाचा ताबा सुटला आणि कार शेतामध्ये भरलेल्या पाण्यात कोसळली. कारमध्ये असलेल्यांनी सीट बेल्ट लावले नव्हते. जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केला पण दरवाजे उघडत नव्हते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group