हृदयद्रावक घटना : पंढरपुरच्या वारीत ट्रकनं चिरडलं, महिला वारकऱ्याचा अपघाती मृत्यू
हृदयद्रावक घटना : पंढरपुरच्या वारीत ट्रकनं चिरडलं, महिला वारकऱ्याचा अपघाती मृत्यू
img
Dipali Ghadwaje
आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. मृदुंगाचा गजर, टाळ-चिपळ्यांचा नाद, विठुनामाचा गजर आणि माऊली माऊलीच्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या पंढरीच्या वाटेवर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

वारीला निघालेल्या धाराशिवच्या एका महिला वारकऱ्याचा वारीच्या मार्गावरच अपघाती मृत्यू झाला आहे. उषा अशोक व्यवहारे (रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. यंदाच्या आषाढी वारीसाठी आपल्या गावातील इतर महिलांसोबत पायी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या होत्या.
 
पंढरीच्या वाटेवर धाराशिवच्या वारकरी महिलेचा अपघाती मृत्यू झाला. शनिवारी रात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास वाखरीजवळ रस्त्यावरून जात असताना त्यांना वाहनाने धडक दिली. रोड कॉस करताना महिलेला दिंडीतील वाहनाने(ट्रक) चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. उषा व्यवहारे यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि वारीत सहभागी झालेल्या इतर महिलां हळहळ व्यक्त करत आहेत.

विठुरायाच्या भेटीची आस घेऊन पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या उषाताईंना पंढरीच्या विठोबाचे केवळ काही अंतरच उरले होते. पंढरीच्या वाटेवरच महिलेनं जीव सोडल्यामुळे इतर वारकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group