राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पत्रकार परिषद घेत अनेक संशयास्पद गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. माझ्या पत्रकार परिषदेनंतर तपास यंत्रणांच्या तपासाला वेग आला. त्यानंतर इतर नेते देखील पत्र द्यायला लागले, ही चांगली गोष्ट आहे. ब्लॅक बॉक्सबाबत मी एक विधान केलं होतं. ते देखील आता खरं होतंय. ब्लॅक बॉक्स जळाल्याचं आता सांगण्यात येत आहे, असं रोहित पवार म्हणाले. आमच्यासारखा बिना बॅकग्राउंडचा, बिना सरकारमधील व्यक्ती एवढी माहिती गोळा करू शकतो मग सत्तेतील लोकांना हे का शक्य नाही?, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला.
एखादा बॉल जर मातीत पडला तर तो कमी आदळतो, पण तो टणक रस्त्यावर पडला, जास्त आदळू टप्पे घेतो. आपण जर अपघात स्थळी पाहिलं तर अजित दादाचं जे विमान होते, कडक सरफेसवर पडलं, रनवेवर पडलं नव्हतं. तर एका साईडला पडलं होतं. त्यामुळे ते जोरात आदळलं. आता त्यांच्या विमानाचा स्फोट का झाला याबद्दल शंका घेतली जात, त्याचं मुख्य कारण, याबद्दल काही शंका व्यक्त करण्यात येत आहे. ती खरी ठरताना दिसत आहेत. अजित दादांच्या त्या विमानात जे फ्यूल टँक होते, ते अधिकचे होते. खरंतर विमानात टॉयलेटच्या बाजूला फ्यूल टँक असतात. त्याच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
आणि हे विमान जेव्हा मुंबईवरून बारामतीला गेलं तेव्हाच ते फ्यूल टँक भरले होते. पण मग फ्यूल टँक पूर्ण भरायची गरज नव्हती. बारामतीला दादांना सोडल्यावर विमान पुढे जाणार होतं, मग पुढे हैद्राबादला जाऊन विमानात इंध भरता आलं असतं ना. कोणी असं म्हणेल की महाराष्ट्रात इंधन स्वस्त असतं, म्हणून भरलं असेल तर मह इथल्यापेक्षा गुजरातमध्ये त्याहीपेक्षा स्वस्त होतं असा युक्तिवाद रोहित पवार यांनी केला. त्यामुळे विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय ? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. मुद्दाम पायलटचा वापर करून घातपात झाला असावा असा मोठा दावा रोहित यांनी केला. विमानात फ्यूएल जास्त असलं, तर स्फोट मोठा होईल ही शंका खरी ठरत आहे असंही ते म्हणाले.