अजितदादांच्या विमान अपघातानंतर डिजीसीएची VSR कंपनीवर मोठी कारवाई
अजितदादांच्या विमान अपघातानंतर डिजीसीएची VSR कंपनीवर मोठी कारवाई
img
वैष्णवी सांगळे
अनेक नियमभंग आणि प्रक्रियात्मक त्रुटी आढळल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ‘व्हीएसआर व्हेन्चर्स’ ( VSR )  या कंपनीच्या चार विमानांना तत्काळ उड्डाणास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या महिन्यात बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य चार जणांचा मृत्यू झाला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ‘डीजीसीए’ने ही पहिली मोठी कारवाई केली आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताशी संबंधित प्रकरणात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) VSR कंपनीवर पहिली कारवाई केली आहे. DGCA ने Clear Jet 40-45 मॉडेलच्या चार विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. यामध्ये VTVRA, VTVRS आणि VTVRTRI या विमान क्रमांकांचा समावेश आहे.

DGCA च्या ऑडिटमध्ये विमान देखभालीमध्ये अनेक त्रुटी आणि कमतरता आढळल्या आहेत. हवाई सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचेही तपासणीत समोर आले आहे. या गंभीर अनियमिततांमुळे DGCA ने VSR कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांचे उत्तर मागितले आहे. या कारवाईनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत DGCA च्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, ही कारवाई म्हणजे केवळ “नखा” म्हणजे अर्धवट यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील अनेक गोष्टी अजून समोर येणे बाकी असून, लवकरच सविस्तर बोलेन असे रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे. 

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीवर गंभीर आरोप केले जात होते. तपास यंत्रणांनी अपघातग्रस्त विमानाची तपासणी केली. तसेच विमानाचा डेटा गोळा करण्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलं होतं. याबाबतचे वेगवेगळे दावे, आरोप केले जात होते. यानंतर DGCA कडून VSR कंपनीच्या विमानांचं ऑडिट केलं जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली होती. त्यानुसार आता DGCA ऑडिट करण्यात येत आहे. DGCA ने VSR कंपनीच्या चार विमानांच्या उड्डाणावर बंदी  घातली आहे. VSR कंपनीसाठी हा मोठा धक्का आहे. या प्रकरणी आता काय-काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group