अख्खं कुटुंबच संपलं!  कंटेनरच्या धडकेमुळे भीषण अपघात
अख्खं कुटुंबच संपलं! कंटेनरच्या धडकेमुळे भीषण अपघात
img
DB
अहमदनगर :  अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी कंटेनर आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मन सुन्न करणारी ही घटना पांढरी पूल परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. अपघातामध्ये आई-वडिलांसह दोन भावडांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. अनिल बाळासाहेब पवार (वय २८), सोनाली अनिल पवार (वय २२), माऊली अनिल पवार (वय ११), अशी मृतांची नावे आहेत. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 

नागरिकांचा रोष पाहताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पवार कुटुंबीय वडगाव सावताळ (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील रहिवासी होते. रविवारी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर एकाच स्कूटीवरून ते घरी परतत होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास पांढरी पूल परिसरात पवार कुटुंब आले असता, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये पवार कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group