नाशिकरोडला दोन तरुणांची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
नाशिकरोडला दोन तरुणांची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी):-येथील दोन विवाहित तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या कुटूंबाच्या तणावातुन केल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

देवळाली गाव येथील रोकडोबावाडी येथील अंकुश भास्कर तायडे (वय 30) हा विहितगांव येथे भाड्याने राहत होता. कौटुंबिक वाद सुरु होते. काल त्याच्या बंद असलेल्या घरा जवळून उग्रवास येत असल्याने पोलिसांच्या मदतीने घराचे दार उघडले असता त्याने दोन ते तीन दिवसांपूर्वी गळफास घेतेल्याचे लक्षात आले. अंकुशच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलं, विवाहित बहिणी असा परिवार आहे.उपनगर पोलिसांनी आकास्मिक मृत्युची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहे. 

दुसरी नाशिकरोड परिसरत घडली असून गोरेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता सुशील किसन कटारे (वय 32) हा पत्नी दोन मुलांसह वेगळा राहत होता. पत्नी आणि त्याच्यात पैशांवरून किरकोळ वाद झाला. पत्नी मामाच्या घरी गेली, कोणी घरात नसल्याचा फायदा घेत सुशील याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सुशीलाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी व नऊ महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.

सामाजिक कार्य करणाऱ्या व कौटुंबिक जबाबदारी असतांना दोन तरुणांनी आत्महत्येचे पाऊल उचल्याने परिसरत हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस तपासात काय निष्पण होईल या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group