देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! भरधाव टेंपोने चिरडल्याने 4 भाविक ठार, 5 जण गंभीर
देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! भरधाव टेंपोने चिरडल्याने 4 भाविक ठार, 5 जण गंभीर
img
Dipali Ghadwaje
हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पीकअपने ९ भाविकांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झालेत.



याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवदर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. हे सर्व भाविक हिंगोली तालुक्यातील सिरसम गावचे रहिवासी आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारचा दिवस असल्याने हे भाविक सिरसम येथून माळहिवरा पाटी येथील मारुतीच्या दर्शनाला निघाले होते. मात्र या भीषण अपघातात पाच जणांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी भाविकांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group