मामाच्या घरी १६ वर्षीय मुलाची आत्महत्या, चिठ्ठीतून काळीज चिरणारं कारण समोर
मामाच्या घरी १६ वर्षीय मुलाची आत्महत्या, चिठ्ठीतून काळीज चिरणारं कारण समोर
img
Vaishnavi Sangale
सोलापुरात झालेली १६ वर्षीय युवकाची आत्महत्या आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिट्ठी तुमचंही काळीज चिरून टाकेल. सोलापुरातील शिवशरण तळकोटी या 16 वर्षीय तरूणाने आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तीन महिन्यापूर्वी त्याच्या आईचं कावीळ झाल्यामुळे निधन झालं होतं. शिवशरण याला आईच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला होता. शिवशरण आईच्या मृत्यूनंतर त्याच्या मामाकडे राहात होता, त्यानंतर त्याने आता टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने टोकाचं पाऊल उलण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहली आहे. यामध्ये त्याने आईने आपल्याला बोलावलं असल्याचं म्हटलं आहे. 

धक्कादायक ! जिवाभावाचा मित्र वाढदिवसाला आलाच नाही, संतापलेल्या मित्रांनी केलं असं काही की..
काय लिहलंय त्याने चिठ्ठीत?
'मी शिवशरण. मी मरत आहे.कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होते पण मी मामा व आजीचे तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे.. आई काल स्वप्नात आली होती. 'तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये..' असे म्हणून तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे व आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले. मामा.... मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचं आहे. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलंस', अशी भावनिक चिठ्ठी त्याने टोकाचं पाऊल उचलण्याआधी लिहली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group